Saturday 13 July 2019

माझ्यातच मी हरवलेला

भळाळणाऱ्या जखमाने जरा सावरा स्वतःला , ओघळणाऱ्या अश्रूनो आवरा स्वतःला . जखमेवरची खपली निघून परत ठसठसणारा वेदनांचा हुंदकार नका सोडू असा माझ्या अंतरी . माणूसच शेवटी मी चुका ह्या होणारच कधी पर्यंत पाठलाग करणार तुम्ही अश्या, थोडं मला माझ्या जोशात आणि माझ्याच होश व मस्तीमध्ये मला थोडं जगूद्याना. भळाळणारी जखम आणि ओघळणारे अश्रू घेऊन मी कुठवर हा हुंदक्यांचा गाडा हाकणार सरत शेवटी माणूसच ना मी . . नाही मला झेपणार हे ओझे आता . . मला मन मोकळे करू द्या माझे हुंदकारे बाहेर येऊद्या . गरजू द्या ह्या हुंदक्यानं . . हे नुसते हुंदके नाहीत तर ते वेदनांचे बांध आहे . त्यांना तुटू द्या , त्यांना फुटू द्या आणि स्वैरपणे वावरू द्या त्यांना त्यांचाच मस्तीत. मदमस्त होंऊन माझ्या बोकांडी बसलेल्या ह्या असह्य अश्या वेदानेनां मी झिडकारू इच्छितो . . पण त्या पाठ सोडतील तर ना . . ??? --गजानन माने (ब्लॉग १४. ०७)

Monday 20 August 2018

जाळ

कोळी कधीच स्वतः विणलेल्या जाळ्यात फसत नाही . . पण माणसाचे तसे नसते . . तो कधी कधी स्वतःच विणलेल्या जाळ्यात इतका गुरफटून जातो कि त्यातून बाहेर पडणे त्याला खूप मुस्कील हौऊन जाते . हो हे खरे आहे . . म्हणून म्हणतो आजच्या इतका सुंदर दिवस जगण्यासाठी तुम्हाला आयुष्यात परत कधीच भेटणार नाही म्हणून आजचा दिवस आजच पूर्ण आनंदाने जागून घ्या . . खोटे वाटते का ?? आठवा जरा आपले बालपणाचे, शाळेचे, . . कॉलेजचे दिवस , ते दिवस आठवले कि, त्या वेळी नको असणारे ते दिवस आज आपल्याला किती हवे हवे वाटतात ना. आजच्या दिवसाचे पण तसेच आहे . . कदाचित उद्या तुमच्याकडे सगळे काही असेल पण . . तुमच्याकडे आज जो दिवस आहे तो नसेल. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आनंदाने जगायला शिकूया .

Saturday 18 August 2018

नियती

कधी कधी नशीब इतके देते . . कि ते घ्यायला आपली ओंजळ कमी पडते . . आणि कधी कधी नियती आपल्याशी असा खेळ खेळते कि ,आपण फक्त तिच्या हातातील बाहुले बनून राहतो . ती आपली कधी क्रूर चेष्टा करते . . तर ती आपल्याला कधी कधी प्रेमाने अंजारते , गोंजारते . . . . आणि शेवटी हेच अंतिम सत्य आहे कि, आपण फक्त नियतीच्या हातातील बाहुले आहोत . . जेंव्हा जेंव्हा हे ज्याला कळले तो जगात सुखी समाधानी बाकी . . बाकी आम्ही सगळे धावत्या मशिन्स .

Sunday 8 July 2018

आठवणी

आठवणी ह्या आजीबाईच्या गोठोड्या प्रमाणेच असतात . ते एकदा सोडले कि . . तो काळ ती वेळ तो प्रसंग आपल्या समोर उभा राहतो . . त्याला अनेक प्रसंग जोडलेले असतात . . जसे जसे आपण पुढे जाऊ तस तश्या ह्या आठवणी काही धूसर तर काही गडद होत जातात . काही आठवणी मनाला फुंकर घालतात तर काही आठवणी मनाला टोचणाऱ्या . . पण आठवणी ह्या आठवणीच त्या फक्त आठवणे हेच तर आपल्या हातात असते . . कारण काळाने आपल्या खूप खूप पुढे आणलेलं असते . गजानन माने .

माझ्यातच मी हरवलेला

भळाळणाऱ्या जखमाने जरा सावरा स्वतःला , ओघळणाऱ्या अश्रूनो आवरा स्वतःला . जखमेवरची खपली निघून परत ठसठसणारा वेदनांचा हुंदकार नका सोडू असा माझ...